शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : सभागृहात डमरू वाजवायला गेला आहात काय? : हार्दिक पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 19:12 IST

विटा : महाराष्ट्रातील भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षणाचे दिलेले आश्वासन पाळले नसून, सरकार वेळकाढूपणा करीत आहे. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक ...

ठळक मुद्देप्रत्येक राज्यात समाजाला लोकसंख्येनुसार आरक्षण द्याकेवळ विरोधी पक्षानेच आवाज उठविला पाहिजे असे नाही

विटा : महाराष्ट्रातील भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षणाचे दिलेले आश्वासन पाळले नसून, सरकार वेळकाढूपणा करीत आहे. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करता येत नसेल, तर तुम्ही सभागृहात डमरू वाजवायला गेला आहात काय? महाराष्टÑातील भाजप सरकार जुमलेबाजीतच अडकल्याची टीका गुजरात येथील पाटीदार समाज आरक्षण आंदोलनाचे प्रणेते हार्दिक पटेल यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

धनगर समाजाच्या महामेळाव्यासाठी हार्दिक पटेल विटामार्गे आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) गावाकडे रवाना झाले. त्यापूर्वी त्यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधून आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले की, धनगर समाजाला यशवंतराव होळकर, अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा थोर वारसा आहे. मात्र, या समाजावर अन्याय होत आहे. प्रत्येक राज्यात समाजाला लोकसंख्येनुसार शिक्षण, नोकरी व राजकीय आरक्षण दिले पाहिजे. परंतु, लोकसंख्येवर आरक्षण दिले तरी, प्रत्येक समाजात कष्ट घेणाºयांच्या गुणवत्तेला न्याय मिळाला पाहिजे. कोणताही समाज जोपर्यंत शैक्षणिक प्रगती करीत नाही आणि घटनात्मक पध्दतीने मजबूत होत नाही, तोपर्यंत  देशाची प्रगती होणार नाही.

सरकारने लोकसंख्येनुसार आरक्षण दिले नाही तर, जो समाज पाठीमागे आहे, तो जास्तच मागे राहणार आहे. ज्या समाजाला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक भागीदारी मिळणार नाही, त्याला तुम्ही जास्तच मागे फेकून देणार आहात काय? नेत्याच्या मुलानेच नेतेगिरी करावी काय? जिल्हाधिकाºयाचा मुलगाच जिल्हाधिकारी होणार काय? पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही, असे कोठे लिहिले आहे?  लोकांनी तुम्हाला विश्वासाने सत्तेवर बसविले असताना, लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करता येत नसेल, तर तुम्ही सभागृहात डमरू वाजवायला गेला आहात काय? असे अनेक सवालही यावेळी पटेल यांनी केले.

ते म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षणाचे दिलेले आश्वासन पाळले नसून, धनगर आणि धनगड शब्दांचा खेळ करून सरकार वेळकाढूपणा करीत आहे. महाराष्टÑातील भाजप सरकार जुमलेबाजीतच अडकले आहे. यावेळी धनगर समाज आरक्षण आंदोलनाचे नेते गोपीचंद पडळकर, उद्योजक शरद बाबर उपस्थित होते.

जनतेनेही रस्त्यावर उतरावेआपला देश घटनेवर चालतो. आरक्षण दिल्यानंतर प्रगती का होत नाही, याचा विचार सरकारने केला पाहिजे. गरिबांना सुविधा देण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे जेथे समाजावर अन्याय होत असेल, तेथे केवळ विरोधी पक्षानेच आवाज उठविला पाहिजे असे नाही. आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी आता जनतेनेही रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी हार्दिक पटेल यांनी व्यक्त केली.

टॅग्स :BJPभाजपाhardik patelहार्दिक पटेल